Skip to main content

सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता ,ग्रामपंचायत निवडणूक लागणारे कागदपत्रे

प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायत कार्यालय व गावाची देखरेख करणारा व्यक्ती म्हणजे सरपंच. तर प्रत्येकाची इच्छा असते की गावात आपण सरपंच व्हायचे निवडणूक लढवायची परंतु सरपंच निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक मध्ये उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? सरपंच निवडणुकीसाठी पात्रता काय असते ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियम व अटी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला येथे मिळेल

सरपंच निवडणुकीसाठी पात्रता - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्रता 

तुम्हाला जर सरपंच निवडणुकीसाठी उभे राहायचे असेल तर खाली दिलेले पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. 

1) सरपंच निवडणुकीत उभी राहणारी व्यक्ती भारतीय असावी.

2) उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे.

3) ज्या ग्रामपंचायत साठी निवडणूक लढत आहेत त्या ग्रामपंचायतीचा मतदाता असणे आवश्यक आहे.

4) उमेदवाराकडे ग्रामपंचायत तिचा कोणताही कर घरपट्टी पानपट्टी थकबाकी नसावी.

5) उमेदवार हा शासकीय व सरकारी कर्मचारी नसावा.

6) उमेदवाराच्या नावावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा.

7) ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला दोन पेक्षा जास्त मुलं किंवा आपत्य नसावेत.

8) उमेदवार हा कमीत कमी सातवी पास असणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी आवश्यक गोष्टी 

१) आधार कार्ड 
२) पेन कार्ड 
३)मतदान कार्ड 
४) मतदाराचा प्रभाग  
५) यादी भाग क्रमांक 
६) मतदाराचा अनुक्रमांक(नवीन मतदान यादीमधील)
७) जात दाखला-आरक्षित जागेतून  फॉर्म भरत असेल
८) उमेदवार जर आरक्षित जागेतून  फॉर्म भरत असेल तर जात पडताळणी पावती नंबर 
९) उमेदवार बँक माहिती 
१०) उमेदवार चल,अचल(बँक, घर(८ अ उतारा), जमीन(७/१२,८ अ जमीन उतारा), शेअर्स, LIC, दोन चाकी,चार चाकी वाहन,ज्वेलरी, सोने,चांदी इ. माहिती 
११)उमेदवाराच्या किवा त्याच्या पत्नीच्या नावे बँक कर्ज,वाहन कर्ज किवा इतर कर्ज असेल तर त्याची माहिती 
१२) इन्कमटॅक्स असेल तर माहिती 
१३) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (शाळा सोडलेचा दाखला )
१४) उमेदवारास मुले असतील तर त्यांची जन्मतारीख 

 आमचेकडे निवडणूक अर्ज बिनचूक  ऑनलाईन करून मिळतील 
                      मो. विलास उतेकर सर ९४२१११६६०४ 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...