Skip to main content

शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी...

 

'Job_Persistent.jpg' failed to upload. TransportError: There was an error during the transport or processing of this request. Error code = 103, Path = /_/BloggerUi/data/batchexecute

राज्यातील तरुणांना एकात्मिक, सर्वांगीण कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि विविध एमटेक अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अनुदानीत) स्थापन करण्यात आले आहे. 

काैटुंबिक जबाबदाऱयांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी पर्सिस्टंट सिस्टम्सने दिली आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे.


हा कार्यक्रम महिलांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये, व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो, जेणेकरून त्यांचे करिअर आत्मविश्वासाने पुन्हा सुरू होईल. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आला आहे, ज्यांना विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करण्याची इच्छा असलेल्या राज्यभरातील हजारो महिलांना सक्षम करण्यात मदत होईल. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना पर्सिस्टंटमध्ये स्थान मिळण्याची संधी मिळेल.


कौशल्य विद्यापीठातर्फे राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली जाणार असून विद्यापीठाने अलीकडेच 

1) इंटरनेट ऑफ थिंग्ज,                                          

2) आर्टिफिशियल इंटेलिजन्स,                                                                                           

 3) सायबर सिक्युरिटी, 

4) इंडस्ट्री 4.0, 

5) बिझनेस अॅनालिटिक्स

6) बीबीए रिटेलसारख्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांतर्गत एमटेकसारखे उच्च कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम औद्योगिक भागीदारांशी संलग्न असून ते पूर्ण करणाऱयांना प्रमाणपत्रदेखील प्रदान करण्यात येणार आहेत.


हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पर्सिस्टंट सिस्टम्सद्वारे नियुक्त केले जाईल, या उपक्रमांतर्गत कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे करीअरपासून 1 ते 4 वर्षे दूर राहिलेल्या आणि तांत्रिकदृष्टय़ा पात्र असलेल्या महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ कौटुंबिक जबाबदाऱयांमुळे अनेक महिला चांगल्या करीअरपासून वंचित राहतात. त्यांच्यात योग्य क्षमता असूनही त्यांची प्रगती होऊ शकत नाही. या दृष्टीने विंग्स हा या तंत्रकौशल्ये आत्मसात केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा एक सामाजिक उपक्रम आहे. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या https://mssu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.




 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...