Skip to main content

सातबारा मिळकत पत्रिकावर आता यु एल पिन UL PIN

 


सातबारा मिळकत पत्रिकावर आता यु एल पिन UL PIN बंधनकारक केंद्र शासनाच्या सूचनेला राज्याची मान्यता

सातबाऱ्यावर यु एल पिन नंबर देण्यास शासनाने मान्यता दिली आहे राज्यातील सर्व सातबारा उतारे आणि मिळकत पत्रिका वर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच यु एल पिन नंबर दिसणार आहे.


सातबारा UL PIN संदर्भातील एक शासन निर्णय 30 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आलेला आहे. हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल काय पडेल

महाराष्ट्र राज्यात याआधीपासूनच गावनिहाय्य दस्तऐवज जतन केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक गावातील महसुली दप्तरांमध्ये पहिल्या क्रमांकापासून सुरुवात केली जाते.


आता मात्र UL PIN येणार असल्याने देशातील कोणत्याही मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक दर्शविला जाईल व त्याची दस्ताऐवजाची ओळख तात्काळ पटवणे शक्य होईल.


UL PIN मुळे असे होणार सातबारा उताऱ्यावरील बदल


गट क्रमांक व उपविभागाच्या उल्लेखाआधी आता पिन क्रमांक टाकला जाईल.

सातबारा उतारा दस्ताऐवजावर यू एल पीन संबंधीचा स्कॅन केला जाणारा क्यूआर कोड दिसेल. हा कोड सातबाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात असेल आणि या ठिकाणी एक क्रमांक देखील दिला दिसेल.

मिळकत पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.

पत्रिकेवरील पहिल्या ओळीच्या वरील डाव्या बाजूला यू एल पिन क्रमांक दिला जाईल.

जसा नागरिकांना आधार क्रमांक दिला जातो आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते अगदी अशाच पद्धतीने हा युएलपिन काम करणार आहे. UL PIN मुळे सातबऱ्यामध्ये मोठा बदल झाला असून यामुळे दस्ताऐवज मिळविणे खूपच सोपे ह होणार आहे.


थोडक्यात यु एल पिन म्हणजे मालमत्तेचा आधार क्रमांकच आहे. 

युएल पिनमुळे संपूर्ण माहिती अगदी एका क्लिकवर मिळण्यास मदत होणार आहे.



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...