Skip to main content

मागेल त्याला सोलर पंप, जमिनीच्या क्षेत्रानुसार दिले जाणारे पंप,लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा,आवश्यक कागदपत्रे सर्व माहिती

 



मागेल त्याला सोलर पंप

योजनेचे नाव

मागेल त्याला सोलार पंप योजना

कोणी सुरुवात केली

महाराष्ट्र शासन

चालू वर्ष

2025

लाभार्थी

महाराष्ट्रातील शेतकरी

उद्देश

शेतकऱ्यांना कमी खर्चात सिंचनासाठी शाश्वत आणि स्वतंत्र पाणीपुरवठा साधन उपलब्ध करून देणे

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन


 

 

 

 

 


योजनेची ठळक वैशिष्टे

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा

योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराने आधी कोणत्याही सौर पंपाचा फायदा घेतलेला नसावा.
  • अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारीत जमीन असावी.
  • सामायिक जमिनीच्या बाबतीत, सर्व भोगवाटेदारांची संमती पत्र असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

 जमिनीच्या क्षेत्रानुसार दिले जाणारे पंप

अश्वशक्ती क्षमता (HP)

जमिनीचे क्षेत्र

3 HP

2.5 एकरापर्यंत

5 HP

2.51 एकर ते 5 एकरापर्यंत

7.5 HP

5 एकरा पेक्षा जास्त

लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा

अश्वशक्ती क्षमता (HP)

SC / ST
प्रवर्गांनी भरायची रक्कम
(5 % रक्कम
)

इतर प्रवर्गांनी भरायची रक्कम
(10 % रक्कम)

3 HP

11486/-

22971/-

5 HP

16038/-

32075/-

7.5 HP

22464/-

44928/-


अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 7/12 उताऱ्यावर विहिर किंवा कुपनलिका नोंद आवश्यक
  • सामाईक क्षेत्र असल्यास इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र

निष्कर्ष

योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप देऊन सिंचनासाठी पाणी पुरवण्याचे आहे. यामुळे विजेच्या तुटवड्यातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याचा वापर करता येतो, आणि उत्पन्न वाढवता येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, विमा आणि दुरुस्तीची हमी मिळते, जे त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ?

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

सौर कृषीपंप म्हणजे काय ?

सौर कृषीपंप हा सुर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...