वहिवाटीच्या
रस्त्याला अडवणूक झाली असेल तर असा
करा अर्ज
अस्तित्वात असलेल्या
रस्त्याबाबत कोणीही सूट भावनेने अथवा त्रास व्हावा या हेतू अडथला केल्यास किंवा
काही बाधा होईल असे कृत्य केल्यास न्याय मागता येत असतो. यासाठी अत्यंत सोपी व जलव
प्रक्रिया आहे आणि या अंतर्गत केवळ ८ ते १० दिवसांत सम्बन्धित रस्ता खुला करण्यात
येतो. त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आपण पाहूया.
१.१. अर्जदाराचे मा. तहसिलदारकोर्ट कायदा अन्वये अर्ज सादर करावा लागतो.
२. अर्ज साधा व शेतकर्याच्या भाषेतील असला तरी चालतो आणि
त्यासाठी कायद्याची भाषा व काटेकोरपणाची आवश्यकता नाही तसेच अगदी आपल्या बोली
भाषेतील अर्ज घरीच लिहिला तरी चालतो.
3. अर्जाच्या सर्वात वर मामलेदार कोर्ट कायदा कलम ५ अन्वये
अर्ज असे लिहावे लागते.
४. अर्जात अडथला निर्माण केलेल्या शेतकर्याचे नाव पत्ते
(संपूर्ण माहिती) मोबाईल नंबर लिहावेत.
५. अडथला झालेला रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असावा
लागतो.( गुगल मेप कढला असेल तर उत्तम)
६. अर्ज अडथला केव्हा निर्माण केला त्याची तारीख व उद्भवल्याचे स्वरूप लिहावे लागते.
७. अडथला निर्माण झाल्यापासून ६ महिन्याच्या आत अर्ज केला
पाहिजे
८. नव्या रस्त्यास मागणीसाठी हा सदर अर्ज लागू होत नाही.
नवीन रस्ता हवा असेल तर दुसर्या पद्धतीने अर्ज करावा.
९. वहिवाटीचा रस्त्यास अडथला झाल्यावरच हा अर्ज करता येत
असतो.
१०. या प्रक्रियेत अर्ज सादर केल्यानंतर ३ दिवसात अडथला
निर्माण करणाऱ्या शेतकर्यांना नोटीस देऊन व आडवलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ८ दिवसात न्याय देऊन वहिवाटीचा रस्त्याचा
हक्क दिला जात असतो.
महत्याच्या सूचना
१. केवळ कायद्याने रस्ता मिळतो.
२.
२. सर्व पाहणी व आवश्यकता उपयोगिता या बाबींचा विचार करूनच
रस्ता दिला जात असतो.
३. शक्य तो परस्पर सहकार्यारून व सर्वाना उपयोगी होईल या
हेतूने रस्ता असल्यास वाद निर्माण होत नाही.
४. पूर्वापार असलेल्या वहिवाटीवर अडथला निर्माण झाल्यास
जागरूकता दाखवून लवकरात लवकर तो दूर होईल यासाठी स्थानिक पातळीवर प्रयतन करावे आणि
तसे करूनही प्रश्न सुटत नसेल तर मामलेदार कोर्ट कायदा अन्वये सादर करावा लागतो.
५. नवीन वहिवाट रस्ता मागणी किंवा पूर्वापार वाहिवातीव्र
अडथला यासाठी फार कायद्याचे ज्ञान असावे असे नसून स्वत अर्ज सादर करूनही आपण आपले
म्हणणे मांडू शकत आहात.
६. इतरांची मालमता नसलेल्या सर्व जमिनी, रस्ते,गल्या, मार्ग, वहिवाट, इ. वर शासनाची मालकी असते.
७. कोणत्याही जमिनीवरील रस्ते वहिवाट विषयी वाद निर्माण
झाल्यास मा.
जिल्हाधिकारी सो यांना पाहणी व निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि त्यावेळी
त्याची उपयोगिता व आवश्यकता विचार घेऊन रस्त्याचे हक्क ठेवणे किंवा रद्द करणे या
विषयी निर्णय होऊ शकतो.
८. प्रत्येक अर्जाची व कागदपत्राची स्थल प्रत स्वताकडे असणे
आवश्क आहे.
माहितीसाठी सादर
अश्वटेक कॉम्पुटर आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर
Comments
Post a Comment