Skip to main content

आय.टी. आय. २०२५ ची प्रवेश प्रकिया चालू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५ व अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५


आय.टी.आय म्हणजे काय?

आय.टी.आय ही एक व्यावसायिक अभ्यासक्रमाची शासकीय/खाजगी संस्था आहे, जी विविध व्यवसायांमध्ये (ट्रेड्स) प्रशिक्षण देते. हे अभ्यासक्र ६ महिन्यांपासून २ वर्षांपर्यंत असू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी संबंधित व्यवसायात नोकरी करू शकतो किंवा स्वयंपूर्ण व्यवसाय सुरू करू शकतो. विद्युत, वेल्डिंग, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक ऑपरेटर, मेकॅनिकल व मोटार मेकॅनिक असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

 

आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५ -  

 

1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १५ मे २०२५

2. अंतिम दिनांक अर्ज भरण्याचीः ३० जून २०२५

3. प्रथम गुणवत्ता यादी जाहीर होणेः ५ जुलै २०२५

4. प्रवेश (ITI Admission) प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधीः ३१ जुलै २०२५

 

पात्रता:

·        उमेदवाराने किमान इयत्ता ८वी, १०वी किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे (व्यवसायानुसार पात्रता वेगळी असते).

·        उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

·        वयाची किमान मर्यादा १४ वर्षे आहे. काही अभ्यासक्रमांसाठी इतर अटी लागू शकतात.

·        त्यानंतर लॉगिन करून ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे  

 

राज्यातील आय. टी. आय संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम (ट्रेड्स) उपलब्ध आहेत. काही प्रमुख अभ्यासक्रम असेः

 

फिटर

इलेक्ट्रिशियन

वेल्डर

टर्नर

डिझेल मेकॅनिक

कॉम्प्युटर ऑपरेटर

COPA (Computer Operator and Programming Assistant)

प्लंबर

सिव्हिल ड्राफ्ट्समन


व्यवसाय तपशीलाची यादी व पात्रता

: https://admission.dvet.gov.in 

 

या अभ्यासक्रमांची निवड उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व आवडीनुसार करता येते.

 

कागदपत्रांची यादी:

इयत्ता ८वी/१०वी/१२वीचे प्रमाणपत्र

जात व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)

रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड

पासपोर्ट साइज फोटो

शाळा सोडल्याचा दाखला

दिव्यांग सर्टिफिकेट (लागू असल्यास)

EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 

विद्यार्थ्यांना काही उपयुक्त सूचनाः

·       सर्व माहिती अचूक भरावी; चुकीची माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाऊ शकतो.

·       शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

·       अर्ज भरल्यानंतर एक किंवा अधिक पसंतीक्रम नोंदवावेत.

 

प्रवेश मिळाल्यानंतर संबंधित आय.टी. आय मध्ये जाऊन वेळेत प्रवेश निश्चित करावा.

  



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालयामार्फत महिलांसाठी "आई" पर्यटन धोरण अंतर्गत १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज.

  पर्यटन संचालनालय , (DoT)  महाराष्ट्र शासन   पर्यटन संचालनालयामार्फत महिला केंद्रीत  "आई" पर्यटन धोरण पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद‌योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन    विभागामार्फत शासन निर्णय क्र. टीडीएस  2022/12/ प्र.क्र. 750/पर्यटन दि.  19  जुन  2023  नुसार महिलांच्या    सक्षमीकरणासाठी "आई" महिला केंद्रीत    पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे.   1)  महिला उद्‌योजकता विकास 2)  महिलांकरिता पायाभूत सुविधा 3)    महिला पर्यटकांसाठी सुरक्षिततेला प्राधान्य 4) महिला पर्यटकांसाठी कस्टमाईन्ड उत्पादने / सवलती 5)  प्रवास आणि पर्यटन    हि महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची    पंचसूत्री आहे.   पर्यटन संचालनालयामार्फत प्रोत्साहने व सवलती-   या धोरणाअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करताना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणी करिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन    व्यवसायाकरिता बकिने रू....

🗳️ आगामी निवडणुक तुम्ही लढविणार आहात का? हि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा 📍 पद: नगराध्यक्ष/ नगरसेवक / जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य

  ✅ उमेदवाराची पात्रता: 1.       भारतीय नागरिकत्व: उमेदवार भारताचा नागरिक असावा. 2.       मतदार यादीत नाव: संबंधित क्षेत्रातील मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव असणे आवश्यक आहे. 3.       किमान वय: o     नगरसेवक पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. o     जिल्हा परिषद / पंचायत समिती पदासाठी – 21 वर्षे पूर्ण असावे. 4.       दिवाळखोर नसावा: उमेदवार दिवाळखोर नसावा किंवा न्यायालयाने दिवाळखोर घोषित केलेला नसावा. 5.       गंभीर गुन्हा नसावा: उमेदवारावर कोणताही गंभीर गुन्हा दाखल किंवा सिद्ध झालेला नसावा. 6.       सरकारी नोकर नसावा: निवडणुकीच्या तारखेपासून उमेदवार कोणत्याही सरकारी सेवेत कार्यरत नसावा. 7.       कंत्राटदार नसावा: उमेदवार ग्रामपंचायत / नगरपालिका / जिल्हा परिषदेसोबत कंत्राटदार म्हणून कार्यरत नसावा. 8.       कर बाकी नसावी: स्थानिक स्व...

1 एप्रिल पासून आता राज्यात 'जिवंत' सातबारा..मोहीम राज्य शासनाची योजना

 जिवंत सातबारा म्हणजे काय? तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना  या मोहिमेत अत्यंत सोप्या पद्धतीने कमी वेळात काम करुणे देणे . या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा! यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल. एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्...