Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी,केंद्रास मिळणारे लाभ, ऑनलाईन अर्ज करा !- अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  भारतात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध होणार असून शहरी पर्यटकांना शांत , निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळू शकणार आहे. कृषी पर्यटन शेती आणि शेतीवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरू करण्यासाठी कमीत कमी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र असणे आवश्यक आहे.   नोंदणी केलेल्या कृषी पर्यटन केंद्रास पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. या केंद्रांना वस्तू व सेवा कर , विद्युत शुल्क इतरचा लाभ मिळणार आहे. कृषी पर्यटनाची चांगली छायाचित्रे , व्हीडिओ पर्यटन संचालनालयास दिल्यास त्याची प्रसिद्धी विविध माध्यमांतून करण्यात येणार महाराष्ट्र कृषी पर्यटन केंद्र ऑनलाइन नोंदणी - Maharashtra Agro Tourism Online Registration:   कृषि पर्यटनासाठी अटी: १) कृषि पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी किमान १ एकर शेती क्षेत्र असणे , सात-बारा कुटुंबाच्या नावे असणे...

ABHA Card काय आहे?

  ABHA - Ayushman Bharat Health Account हे एक डिजिटल हेल्थ कार्ड असेल. त्यात लोकांच्या आरोग्यासंबंधीची माहिती डिजिटल पद्धतीनं नोंदवलेली आणि सुरक्षित असेल. या युनिक आयडी कार्डमध्ये तुमचा आजार , उपचार आणि वैद्यकीय चाचण्या याबाबतची सर्व माहिती नोंदवलेली असेल. " आयुष्यमान भारत डिजिटल मिशन हे रुग्णालयांमधली प्रक्रिया सहज सोपी बनवण्याबरोबरच ईज ऑफ लिव्हिंगदेखील वाढवेल. सध्या रुग्णालयांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा , केवळ त्या रुग्णालयापुरता किंवा समुहापुरता मर्यादीत असतो. मात्र आता हे मिशन संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या डिजिटल हेल्थ सोल्युशन्सला एकमेकांशी जोडेल. त्याअंतर्गत आता देशातील नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी मिळेल. प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल पद्धतीनं सुरक्षित असेल."   काय आहे हेल्थ कार्ड ? डिजिटल हेल्थ कार्ड हे एकप्रकारे आधार कार्डसारखंच असेल. या कार्डवर तुम्हाला 14 अंकी क्रमांक मिळेल. त्या नंबरद्वारे आरोग्य क्षेत्रात संबंधित व्यक्तिला ओळखलं जाईल. त्या माध्यमातून कोणत्याही रुग्णाची मेडिकल हिस्ट्री (पूर्वीच्या आजारांची माहिती) उपलब्ध होईल.  ...

शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी...

  राज्यातील तरुणांना एकात्मिक , सर्वांगीण कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आणि विविध एमटेक अभ्यासक्रम , प्रमाणपत्र अभ्यासक्रमांद्वारे राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सार्वजनिक-अनुदानीत) स्थापन करण्यात आले आहे.  काैटुंबिक जबाबदाऱयांमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या महिलांना पुन्हा करीअरची संधी पर्सिस्टंट सिस्टम्सने दिली आहे. कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत सामंजस्य करार केला असून विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम महिलांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये, व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतो, जेणेकरून त्यांचे करिअर आत्मविश्वासाने पुन्हा सुरू होईल. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आला आहे, ज्यांना विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करण्याची इच्छा असलेल्या राज्यभरातील हजारो महिलांना सक्षम करण्यात मदत होईल. कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण क...

उद्या पासून महात्मा फुले कर्जमाफी योजना चालू होत आहे. KYC करण्यासाठी अश्वटेक आपले सरकार सेवा केंद्र महाबळेश्वर येथे भेट द्या

  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 अंतर्गत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50000 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा सन 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. तथापी मार्च, 2020 पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने सदर आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही.  सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-2023 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेस दि. 27.07.2022 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील पूर्णतः कर्ज...